Skip to content
+91-2117299291
+91-9923196283
prin.ptsnanveej@mahapolice.gov.in
We strive for the best

Police Training Center Nanveej-Daund

Tal- Daund, Dist- Pune

Police Training Center Nanveej- Daund

Menu

१ मे २०२५ महाराष्ट्राचा ६६ वा वर्धापन दिन पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

१ मे २०२५ महाराष्ट्राचा ६६ वा वर्धापन दिन पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री. डॉ.जयराम सोनवणे ,दौंड हे लाभले, तसेच माननीय श्री. नंदकुमार ठाकूर, भा.पो.से.प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड, यांचे मार्गदर्शनाने मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी श्री.रघुनाथ शिंदे, उपप्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड सर्व अंतर वर्ग, बाह्य वर्ग पोलीस अधिकारी, अंमलदार, वैद्यकीय अधिकारी, मंत्रालयिन कर्मचारी , चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच सत्र क्रमांक 46 मधील नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र पोलीस महासंचालक यांच्याकडून पोलीस दलामध्ये सर्वोत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन्मान चिन्ह दिले जाते सदरचे सन्मान चिन्ह पोलीस प्रशिक्षण केंद्रातील श्री रघुनाथ शिंदे उपप्राचार्य श्री संपत कोळपे साहेब पोलीस उपनिरीक्षक व श्री संदीप साबळे पोलीस हवालदार यांना जाहीर झाले यावेळी प्रमुखाते त्यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी प्रमुखातिथी यांनी महाराष्ट्राच्या निर्मिती करता बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना वंदन केले तसेच प्रशिक्षणार्थी यांच्याकडून देशसेवा व कर्तव्यनिष्ठा बाळगण्यासाठी आवाहन केले यावेळी पत्रकार जाधव सेवानिवृत्त अधिकारी अंमलदार कुटुंबीय ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र दिन दरवर्षी १ मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा व त्या अनुषंगाने राज्याच्या एकात्मतेचा प्रतीक आहे.

महाराष्ट्र दिनाचे महत्त्व:

१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. याआधी मुंबई राज्य अस्तित्वात होते, ज्यात गुजराती व मराठी भाषिक लोक होते.

भाषावार प्रांतरचनेच्या मागणीमुळे मुंबई राज्याचे विभाजन करून दोन वेगवेगळी राज्ये — महाराष्ट्र (मराठी भाषिक) आणि गुजरात (गुजराती भाषिक) — तयार करण्यात आली.

ही घडामोड "संयुक्त महाराष्ट्र आंदोलन" या ऐतिहासिक चळवळीचा परिपाक होती, ज्यामध्ये अनेकांनी सहभाग घेतला व काहींनी बलिदानही दिले.